आयुर्वेदानुसार निरोगी आरोग्याची पंचसूत्री

       आयुर्वेद जगातील सर्वात प्राचीन भारतीय वैद्यकीय शास्त्र आहे. आयुर्वेद हे नाव सर्वांमध्ये प्रचलित आहे पण आयुर्वेद बद्दल भारतीय लोकांमध्ये अज्ञान आहे , अहो भारतीय आपलं स्वतःच शास्त्र असून सुद्धा त्याचा बद्दल आपल्याला सखोल ज्ञान नाही किंवा जे काही थोडं असावं ते सुद्धा चुकीचं असत. का चुकीच असतं तर आपण ते ज्ञान तज्ञ व्यक्तीकडून आत्मसाद केलं नसत तर ते 4 लोकांना कडून ऐकलं असत , आपल्या देशात मोफतचा चुकीचा सल्ला देणाऱ्यां कमी बिलकुल नाही ते आपल्याला आजू बाजूला चौकाचौकात दररोज भेटतात आणि आपण त्याच बोलणं एकदम मन लावून ऐकतो आणि घरी जाऊन उत्साहाने तो सल्ला पाळणे चालू करतो परिणामी त्याचा फायदा होत नाही तर नुकसान होत त्यामुळे जनसमुदायमध्ये आयुर्वेदाची प्रतिमा खराब होते स्वकर्मा मुळेच, तर कृपया अस काही करू नका तज्ञ व्यक्ती कडून आयुर्वेद सल्ला आपल्याला पर्येंत पोहोचावा यासाठी मी हा लेख लिहीत आहे. जगाच्या पाठीवर प्रचंड पैसे कमावणारे लोक आपल्याला भरपूर भेटतील पण आरोग्य कमावणारे आपल्याला भेटणारे तसे दुर्मिळच. तर आयुर्वेदद्वारे आपण जाणून घेऊ या आरोग्य कसे कमवावे. 

        आयुर्वेद शास्त्राचे उद्दिष्ट आहे की निरोगी व्यक्तीच्या आरोग्यचे रक्षण करणे आणि रुग्णाला आजारमुक्त (व्याधीमुक्त) करणे. आयुर्वेदच्या तत्वानुसार “अग्नि” नावाची संकल्पना आहे. आयुर्वेद सांगत की “सर्व आजाराचे मूळ हे मंद अग्नि” म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा होतो की आपलं आरोग्य हे अग्निवर अवलंबून आहे, जर आपल्याला आरोग्य जपायचं किंवा कमवायच असेल तर आपण आपल्या अग्नीच प्रयत्न पूर्वक रक्षण केले पाहिजे.” आपण जे दररोज आहार सेवन करतो त्याच पचन योग्य प्रकारे करून त्या आहाराचे योग्य परिणमन करून संपूर्ण शरीर, इंद्रियें आणि मन याना पोषण द्यायचे काम अग्नि मार्फत होत असते आणि जेव्हा अग्नि मंद होतो तेव्हा आपल्याला आजार होतात आणि अग्नि नष्ट झाला आपला अंत होतो अस चरक संहिता मध्ये लिहिलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 9 देशामध्ये आयुर्वेद प्रचार आणि प्रसार करताना 5 महत्वाचे गोष्टी माझ्या निरीक्षणात आल्या त्या जर आपण सांभाळल्या तर आपलं आरोग्य आपल्या खिश्यात राहू शकते.

1) व्यायाम – नित्य सकाळी लवकर व्यायाम करणे आरोग्यास अत्यंत उपयोगी आणि महत्वाचे आहे. का हो अस ?
आयुर्वेदमध्ये अष्टांग हृदय नावाचा महत्वाच्या ग्रंथ मधील हा संदर्भ
लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोऽग्निर्मेदसः क्षयः।
विभक्तघनगात्रत्वं व्यायामादुपजायते॥१०॥
व्यायाम केला की शारीर हलके वाटते, उत्साह वाढतो , कार्य कार्य करण्याची क्षमता वाढते, दीप्त अग्नि म्हणजे व्यायाम केल्याने आपला भुकेचा अग्नि एवढा सक्षम होतो की दिवस भरात आपण जो काही आहार सेवन करू तो योग्य पचवून त्याच उत्तम पोषक आहार रसात रूपांतर करुन शरीराचे आणि मनाचे पोषण करतो त्याच बरोबर शारीरिक सुदृढता सुद्धा व्यायामाने मिळते.

SAVE_20200117_131031.jpg

पण व्यायाम कसा असावा ?
दररोज 30 तर 40 मिनिटे फास्ट वाकिंग हा उत्तम व्यायाम. व्यायाम हा वातानुकूलित जागेत करू नये. आणि स्त्रियांनी किंवा तरुण मुलींनी मासिक पाळीमध्ये व्यायाम करू नये.

2) अत्यम्बुपान – जास्त मात्रेत जल सेवन करणे हे भुकेचा अग्नी मंद करण्याचे प्रमुख कारण आहे. बऱ्याच लोकांना सकाळी उठल्यावर 1 ते 3 ग्लास पाणी प्यायची सवय असते. त्याचा समज अस आहे मी सकाळी उठून भरपूर पाणी प्यायलो की पोट साफ होत आणि शारीरिक शुद्धी होते. आपलं गैरसमज मला मला दूर करावासा वाटतो की सकाळी उठून तहान नसताना भरपूर प्रमाणात जल सेवन केलं तर ते अग्नी मंद करायचे प्रमुख कारण आहे. जर जल सेवन करायचे असल्यास तहान लागल्यास करावे व ते कोमट किंवा उष्ण असावे आणि सकाळी जल सेवन करायचे असल्यास ते सूर्य उदया पूर्वी करावे जर तहान लागल्यास.

SAVE_20200117_131858.jpg

किती लिटर पाणी दिवस सेवन करावे ?

कोणी किती लिटर पाणी प्यावे हे अंकात न सांगता जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा कोमट किंवा गरम जल सेवन करावे. प्रत्येकाचे शरीर आणि प्रत्येकाच्या गरजा या एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत.
उदाहरणार्थ – जेवढे पाणी एका एका खेळाडू ला दिवसभरात गरजेचे आहे तेवढेच पाणी एका वातानुकूलित कार्यालयात बसून काम करणाऱ्याला कर्मचाऱ्याला लागणार नाही त्याचा शरीराची गरज वेगळी आहे. त्यामुळे सध्या समाजात जो सरसकट सर्वाना ४ ते ६ लिटर पाणी सेवन करा असा एकच सल्ला दिला जातो तो चुकीचा आहे कारण त्या अधिक पाण्याच्या सेवनाने शरीरातील पचनसंस्थेचा अग्निमंद होते आणि हे सातत्याने झाले तर त्यापासून अजीर्ण , अम्लपित्तसारखे पचन संस्थेचे आजार उद्भवतात.  फ्रीज मधील जलाचे सेवन शक्यतो टाळावे. भोजन सेवन करत असताना नेहमी जलसेवन कोमट किंवा उष्ण जेवणामध्ये थोडे थोडे करावे जे अमृत समान कार्य करते,भोजन पूर्वी जलाचे सेवन अजीर्ण करते, आणि भोजननंतर जल सेवन विष समान कार्य करते म्हणून नेहमी भोजनमध्ये थोडे थोडे जल सेवन करावे.

3) अध्यशन – अध्यशन हा संस्कृत शब्द आयुर्वेद ग्रंथात बऱ्याच ठिकाणी वारंवार आला आहे त्याच अर्थ असा आहे की पूर्वीच्या अन्नाचे योग्य पचन होण्याआधीच पुढच्या अन्नाचे सेवन करणे. हे कारण ज्यास्त प्रमाणात जगात आढळले जाते, कारण आयुर्वेद सांगतो की जेव्हा भूक लागेल तेव्हाच अन्नाचे सेवन करा, पण आपण वेळ झाली म्हणून आता जेवण केलं पाहिजे या विचाराने भोजन करतो पण जेव्हा भूक लागली नसते तेव्हा भोजन करू नये कारण भूक लागणे हे आधीचे अन्न पचण्याचे लक्षण आहे आणि ते जो पर्येंत जाणवत नाही तो पर्येंत भोजन करू नये जर तसे सातत्याने केलं तर अग्निमंद होतो आणि व्यक्ती रुग्ण बनतो म्हणून आपल्या भुकेच्या अग्निकडे लक्ष जरूर द्या आणि अध्यशन टाळा.

SAVE_20200117_132103.jpg

4) विषमाशन –
गरजेपेक्षा अति किंवा कमी किंवा अयोग्यवेळी भोजन सातत्याने करणे म्हणजे विषमाशन.
जे नोकरी करणारे मंडळी आहेत त्यामध्ये हे कारण सातत्याने आढळते कारण त्यांना जेवायची एक फिक्स वेळ दिली जाते त्यात त्यानं जेवण करावं लागत त्यावेळी त्यांना भूक असली किंवा नसली तरी , त्याचप्रमाणे लोकांना भोजन करतात दूरदर्शन पाहता किंवा मोबाईल हाताळता जेवायची सवय असते त्यामुळे न कळत का होईना पण कमी किंवा ज्यास्त जेवतो. काम करत असताना भूक लागते पण कामात मग्न असल्यामुळे आपण जेवण करत नाही पण जेव्हा नंतर जेवायला बसतो तेव्हा भुकेचा अग्नी मंद झाला असतो पण जेवन मात्र आपण त्यात मात्रेत करतो. या सर्व कारणांमुळे आपण विषमाशन आवर्जून टाळावे .

Fruit-Custard-480x270

5) विरुद्ध आहार –
विरुद्ध आहार ही संकल्पना फक्त आयुर्वेद शास्त्रात लिहिली आहे . जे अन्न शरीरातील दोष, धातू, मल याना दुष्ट करते किंवा विकृत करते ते म्हणजे विरुद्ध आहार .
उदाहरण –
दुधाचा चहा किंवा बिस्किटे किंवा चपाती एकत्र करून खाणे हे आपल्याकडे सर्वात जास्त प्रमाणात घेतला जाणार विरुद्ध आहार आहे. फक्त 15 दिवस चहा बंद करून पहा काय फरक पडतोय तुमच्या प्रकृती मध्ये .
2) फळ आणि दूध एकत्र करून सातत्याने सेवन करणे.
3) वजन कमी करण्याच्या उद्देशाने दररोज सकाळी गरम पाणी + मध सेवन करणे .
4) भात शिजवताना त्यात मीठ टाकणे.
अजून बरेच उदाहरण आहेत पण ही उदाहरण सातत्याने सेवन केली जाणारी आहेत. ती जर आपण करत असू तर त्याचे सेवन करू नये .

या वरील 5 गोष्टी कडे जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात लक्ष दिलं तर आपलं आरोग्य नक्कीच उत्तम राहील पण जे लोक आमच्याकडे वेळ नाही असे स्वतःची समजूत काढून लक्ष देत नाहीत तेच लोक पुढे जाऊन इमर्जनसी परिस्थितीला समोरो जातात आणि त्यावेळी त्यांना आई.सी.यु मध्ये झोपायला वेळ काढावा लागेतोच त्यामुळे योग्य वेळीच जागे व्हा आयुर्वेदाची कास धारा आणि आरोग्य कमवा , पैसातर आयुषभर कमवायचा तर आहेच,फक्त पैसेच्यामागे आरोग्याला विसुर नका.”

टीप – वाचकांना विनंती आहे की आयुर्वेद लोकांपर्येंत पोहोचवण्यासाठी या ब्लॉगची लिंक ज्यास्तीतज्यास्त लोकांबरोबर शेअर करा.

  • डॉ. गौरव दवे (आयुर्वेदाचार्य)
    आंतरराष्ट्रीय आयुर्वेद फीजीशीयन
    डिरेक्टर – डॉ. दवे आयुर्वेद पंचकर्म वेलनेस क्लिनिक.
    पनवेल , महाराष्ट्र.
    कॅन्सलटिंगसाठी – 8898888525 (पूर्वनियोजित वेळेनुसार)

 

 

44 habits that can disturb your health according to Ayurveda.

If do you have any one of the following habits than it can disturb your health sooner or later, according to Ayurveda.

1) Nitya Avyayam –  Daily No exercise,  hate exercise, late wake up in morning. 

2) Atyambhupan – the Excessive drinking of water at a time. (Especially after wake in morning) 

3) Dugdhpaan – the Habitual drinking of excessive Tea + Milk or Milk + breakfast.

4) Morning 8 am Breakfast and 9 am lunch 

5) Habitual eating of Banana, cashew nuts, Figs, Almond even without a digested previous meal. 

6) Drinking water before the meal.

7) Drinking water immediately after a meal ( 500-700ml), or drinking water after straight 1 hour (500ml).

8) Eating fruits after a meal.

9) Not eating anything during the sensation of hunger.

10) Daytime sleep after the meal.

11) Only drinking water till a lunch or a dinner without eating anything

12) Morning milk for breakfast and 10 am lunch.

13) Having fruits or fruit juices in the afternoon

14)  Having tea or milkshakes in the afternoon

15) Consuming junk food in the evening without having the previous meal digested and yet having the dinner

16) Drinking of milk 200 ml while bedtime (After dinner)

17) Weekly eat 3 to 4 times 50 to 100 gm peanuts. 

18) Daily Milk + Rice 

19) Daily coconut water

20) Daily intake of 1 or 2 cucumbers.

21) Daily consumption of Curd.

22) Daily Jaggery  or Jalebi, Pedha, Rabadi (Indian sweets)

23)Excessive of Intake of Paneer (Cottage Cheese).

24) Daily intake of  Peanuts + jaggery.

25) Habitual intake of Sprouts.

26) Daily Limbu Pani (Lime Juice) 

27) Excessive intake of potato, rice.

28) Excessive intake of salt with rice.

29) Habitual intake of Non-veg food. (All types of non-veg food Including eggs)

30) Excessive consumption of Ghee. (If digestive fire is weak)

31) Regular drinking of tea (3-4 times a day)

32) Habitual eating of ice cream.

33) Drinking chilled water

34)  Excessive intake of dairy products and other foods made with milk.

35) Daily consumption of watermelon, muskmelon, cucumber in the summer season.

36) Raw vegetable intake. (without cooked)

37) Raw Sprouts intake minimum 50 gm daily.

38) Daily intake of 20-30gm sesame (til).

39) Excessive sugar intake. 

40) Habitual consumption of urad dal or urad dal foods.

41) An absence of bitter and pungent taste in the meal.

42) Fasting the entire day and breaking it with a heavy meal in the dinner

43) Only drinking water while fasting the entire day.

44) Consumption of alcohol and smoking.

All Above mentioned habits disturb equilibrium between vata, pitta and kaph which leads to any diseases.

We are trying to propagate Ayurveda such a way that every reader should get authentic knowledge of Ayurved direct from ancient texts so please do share this blog because always “sharing is caring”

“We need to support Ayurveda just like we did with Yoga”

(For Personal Ayurveda Consultation With DR. GAURAV DAVEE

Contact – drgauravdave17@hotmail.com)

 

 

 

 

आरोग्य आणि आयुर्वेद (आरोग्याच्या टिप्स )

प्रामाणिकपणे स्वतःला एक प्रश्न विचारा कि, अर्थाजनासाठी आपण सगळे दररोज ८ ते १० तास काम करतो, पण आरोग्य कमवण्यासाठी आपण किती वेळ देतो ? अंतःकरणातून काय आलं उत्तर ? प्रत्येकाला उत्तम आरोग्य पाहिजे हि बाब जरी खरी असली तरी ते आरोग्य आजकालच्या फास्ट लाइफमध्ये मिळवायचं कसं हा एक मोठा प्रश्न सगळ्यांना भेडसावत आहेच, तर मग चला पाहूया आयुर्वेद आपल्याला कश्या प्रकारे आरोग्य प्राप्तीसाठी मदत करू शकेल.


आयुर्वेदाच्या दृष्टीने आरोग्य प्राप्त होणे म्हणजे आपल्या शरीरामध्ये वात,पित्त आणि कफ या त्रिदोषाचा, ७ धातूचा आणि ३ मलांचा जेव्हा प्राकृत अवस्थेत असतील किंवा समतोल अवस्थेत तेव्हा आपल्याला आरोग्य प्राप्त झालं असं आपण बोलू शकतो.
तर आपल् आरोग्य चिरकाल टिकून राहावं तर आयुर्वेदाने आपल्याला सांगितलं आहे कि आदर्श दिनचर्या (दैनिंदिन) हे आपण दररोज पाळायला हवी. म्हणजे काय हो ?
१) आयुर्वेदानुसार दररोज सकाळी ब्रम्हमुहूर्तला आपण उठलं पाहिजे म्हणजे सूर्योदयापूर्वी साधारण १ ते २ तास.
Image result for wake up in early morning
२) त्यानंतर मल मूत्र विसर्जन करावे. (टॉयलेटमध्ये वर्तमान पत्र किंवा मासिक न वाचता पूर्ण समाधानकारक करावे)
Image result for defecation in toilet with newspaper
३) दंतधावन – (दात घासणे)आयुर्वेदानुसार आपण जी काही टूथपेस्ट सकाळी वापरतो ती फक्त मधुर रसाची असू नये. तर आयुर्वेद सांगतो कि दंत धांवणासाठी आपण नीम, खदिर, अर्जुन आणि करंज या औषधी वनस्पतीचा चूर्णाचा वापर आपण केला पाहिजे जेणे करून आपल्याला दंत आरोग्य प्राप्त होईल.
तासानं तास “मोरी” घासल्याप्रमाणे दात घासू नये त्यामुळे दातावरील इनामलचा थराला इजा होऊ शकते.
Image result for tooth brush in morning
४) जिव्हा निर्लेखन जीभ साफ करणे.
Image result for tongue cleaning
५) गंडूषजिभ साफ करून झाल्यावर मुख कुहरामध्ये तीळ तेल किंवा पाण्यानी चूळ भरणे. ज्यामुळे हिरड्या आणि दंत आरोग्य प्राप्त होते.
Image result for gargling salt water
६) व्यायाम
आयुर्वेदानुसार व्यायाम हा फक्त सकाळच्या काळातच केला तरच त्याचा फायदा आपल्याला १०० टक्के होतो म्हणून नेहमी व्यायाम हा सकाळीच करावा. व्यायाम करण्यासाठी जिमला जाणं जरुरीचं आहे असं नाहीये तर सकाळी फास्ट वॉलकिंग जरी केलं तर ते आरोग्य आपल्याला प्रदान तर करतच त्याचप्रमाणे आपली कार्यक्षमता वाढवून आपल्याला पचनाच्या विकारांपासून सुद्धा लांब ठेवते.
सकाळी कामाला जाताना घरापासून रेल्वे स्टेशन पर्येंत तर आम्ही दररोज चालत जातो असं सांगणारा जनसमुदाय बराच आहे पण त्यांना खास सांगू ईच्छितो कि, व्यायाम करताना आपलं मन हे आपल्या शरीरावर केंद्रित असणे गरजेचे आहे आणि आपण आरोग्य प्राप्ती साठी व्यायाम करतो एवढा हेतू ठेऊन व्यायाम केला तर तोच ज्यास फलदायी ठरतो, सकाळी कामावर जाताना आपल्या मनात ७.४० ची लोकल किंवा बस पकडायची असचं असत त्यामुळे ते चालणं काही आरोग्यास उपयोगी पडत नाही. थोडक्यात सांगायचं झाल तर “कामात काम, स्नानात लघवी” करण्याचा प्रयत्न करू नये.
“आम्हाला वेळ नाही मिळत हो” असा जनसमुदाय तर फार ज्यास्त आहे त्यांच्या साठी खास “आज व्यायामासाठी वेळ नाही तर उद्या ठेवढाच वेळ हॉस्पिटलमध्ये काढायची तयारी ठेवा.
आता पुढचा प्रश्न येतो कि व्यायाम किती वेळ करावा किंवा केव्हा थांबवावा ? आयुर्वेद सांगतो कि व्यायाम अर्धशक्ती व्हायला पाहिजे, मग आपल्याला समजणार कस अर्धशक्ती शरीराची वापरली कि नाही ? त्याच उत्तर पण आयुर्वेदामध्ये काही हजार वर्षांपूर्वी आधुनिक तंत्रज्ञान नसताना लिहून ठेवलं आहे, ते म्हणतात कि व्यायाम चालू केला कि जेव्हा आपल्या कपाळ आणि नाका जेव्हा घाम यायला लागतो किंवा जेव्हा तोंडानी श्वास घ्यायची वेळ येते त्यावेळी व्यायाम थांबवला पाहिजे. हे सगळी किंवा या पैकी कोणतेहि लक्षण जर जाणवायला लागलं म्हणजे आपली अर्ध शक्ती वापरली गेली असं समजावं आणि नेहमी लक्षात ठेवा कि व्यायाम हा हळू हळू वाढवला पाहिजे नाही तर शरीराला इजा होण्याची शक्यता असते.
IMG_5417
७) नाश्ता – ब्रेकफास्ट हे संकल्पना मुळात भारतीय नसून ब्रिटिश लोकांनी भारतात आणली आणि ती आपल्या भारतीय संस्कृती मध्ये रुजवली हे गोष्ट आपलं विसरता कामा नये.
सध्या जोरात फॅड चालू आहे कि नेहमीहेवी (भरपूर) करायला पाहिजे, हे आयुर्वेदाच्या दृष्टीने अगदी चुकीचे आहे. नाश्ता हा अर्धाजेवण असता कामा नये. नेहमी पचायला हलका असणं गरजेचं आहे. उदाचहा (बिन दुधाचा), तांदळाचं घावण ( आंबवलेले), उपमा, थालीपीठ, पोहे कधीतरी, काळेमनुके, ते खजूर किंवा फळ हे आपल्या नाश्त्याचे
स्वरूपअसायला पाहिजे कारण हे अन्न आपल्या शरीराला अगदीजन्मापासून सात्म्य आहे. बिस्कीट, पाव किंवा बटर हे
बेकरीफूड आपल्या पचन संस्थेसाठी पचनास जड असतात सातत्यानेसेवन केल्यास पुढे जाऊन अजीर्ण, आम्लपित्त सारखे आजार व्हायला सुरवात होते.
Image result for maharashtrian breakfast

८)भोजन आयुर्वेदामध्ये भोजनाचा काळाबद्दल वर्णन करतानालिहिलं आहे कि मनुष्याच्या भोजनाचा काळ प्रातःकाळ आणिसायंकाळी फक्त दोन वेळा भोजन करावे असे लिहिलं आहे. यामध्ये काही खाऊ नये कारण भोजन करण्याची विधीहिअग्निहोत्र करण्यासमान आहे, अग्निहोत्र कर्म हे फक्तप्रातःकाळ आणि सायंकाळीच केल जात. जेव्हा भुकेचा अग्नीतीव्र होईल त्यावेळी भोजन करावे असे आयुर्वेदाने सांगितलं आहे.

१) भोजनाची सुरवात नेहमी २ छोटे आल्याचे तुकडे आणि थोडंसं सैंधव मीठ असं एकत्र खाऊन करावी.

Image result for ginger

२) भोजनाची सुरवात हे नेहमी मधुर रसाच्या पदार्थापासून करावी कारण षड्रसांपैकी (मधुर, अम्ल , लवण, तिखट, कडू आणि तुरट) मधुर रस हा पचनास सर्वात जड असतो त्यामुळे त्याचे सेवन नेहेमी भोजनाच्या सुरवातीला करावे ना कि शेवटी (पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे).

Image result for khir

३) मधुर रसाने – रक्त ,
अम्ल रसाने – मज्जा धातू,
लवण रस – अस्थी ,
कडू रस – मेद
तिखट रस – मांस
तुरट रस – रस धातू वर्धनाचे कार्य होतेच त्याचा बरोबर हा षड रसात्मक आहार शुक्र धातूला सुध्दा पोषण द्यायचं कार्य करतो.

४) भोजनामध्ये नेहमी तुरीच्या (पित्त आणि गॅस वाढवते म्हणून) ऐवजी मूगडाळीचे वरण + भात आणि कमीत कमी २ चमचे गाईच्या तुपाचा समावेश असला पाहिजे.

Image result for moong dal

५) भोजन करताना जल पानाचे नियमजल नेहमी कोमट असावे.
आयुर्वेद सांगतो कि भोजन पूर्वी जर जलपान केले तर ते अजीर्णास कारणीभूत आहे, भोजनमध्ये घोट घोट भर जलपान केले तर ते पचनास मदत करून अमृतसमानकार्य करते , आणि भोजन पश्च्यात जलपान केले तर ते विषाप्रमाणे कार्य करते. त्यामुळे नेहमी भोजन मध्ये घोट घोटभर कोमट जलपान करावे.

Image result for drinking of water while meal

६) भोजनमध्ये फळाचे सेवन करायचे असेल तर ते नेहमी भोजनाच्या सुरवातीला करावे.

Image result for pomegranate

७) शक्यतो दही हे नेहमी सेवन करणे टाळावे खास करून रात्री सेवन करू नाहीये कारण आयुर्वेदानुसार ते बऱ्याच आजाराचे कारण आहे. आणि जर दही सेवन करायचे असेलच तर ते ताकाच्या स्वरूपात केले तर आरोग्यास उत्तम.

Image result for chaas

८) नवीन युग नवीन वाईट सवई असणारच, प्रकर्षाने सांगू इच्छितो कि भोजन करताना आपले मन हे आपल्या शरीरावर आणि आपल्या अन्नावर केंद्रित असावे, कमीत कमी जेवताना तरी टीव्ही, मोबाइलचा वापर टाळावा हे नक्कीच आरोग्यास उपयोगी आहे. आणि तरुण पालकांना विनंती आहे कि आपला लहान पोरगा किंवा पोरगी जेवण करत नाही म्हणून त्याच्या समोर मोबाईल वर विडिओ दाखवून जेवायला द्यायच्या वाईट सवई त्यांना या लहान वयात आपण लावू नका.

Image result for child eating food while watching mobile or tv

९) रात्रीच जेवण किंवा अन्न दुसऱ्या दिवशी खाणे याला आयुर्वेद पर्युषित किंवा शीळ अन्न म्हणून संबोधते आणि हे अन्न बऱ्याच रोगाचं प्रमुख कारण सांगितलं आहे, त्यामुळे अन्न फुकट जाईल या हेतूने आपण जर रात्रीच अन्न दुसऱ्या दिवशी नास्ता किंवा भोजनासाठी वापरात असला तर ते आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे ते त्वरित थांबवले गेले पाहिजे.

१०) दररोज लसूण २ कळी तुपात तळून भोजन करत असताना खाणे आरोग्यास उत्तम आहे.

Related image

११) भोजन पश्च्यात आयुर्वेदामधे दररोज साधं तांबूल (विडा – साधं पान) सेवन करायला सांगितलं आहे.

Image may contain: 5 people, people smiling, night

१२) भोजन पश्च्यात १०० पावले अगदी हळुवार चालणे जेणे करून खालेले पचण्यास मदत होईल.

आयुर्वेदाचे असे काही दिनचर्येमधील गोष्टी आपण दररोजपाळावी तर आपलं आरोग्य हे नेहमी आपल्या मुठीतच राहणार हे गोष्ट आपण विसरता कामा नये.

Image result for night walk

वाचनकांना विनंती – आयुर्वेद विषयक अधिक माहितीसाठी ब्लॉग पेज फॉलो करा आणि लोकांना पर्येंत आयुर्वेद पोहचव्यासाठी हा ब्लॉग शेअर करा.

http://www.drgauravdave.wordpress.com

Dr.Gaurav Davee

International Ayurveda consultant

Email – drgauravdave17@hotmail.com

Mobile number – +91 8898888525

Panvel,