प्रामाणिकपणे स्वतःला एक प्रश्न विचारा कि, अर्थाजनासाठी आपण सगळे दररोज ८ ते १० तास काम करतो, पण आरोग्य कमवण्यासाठी आपण किती वेळ देतो ? अंतःकरणातून काय आलं उत्तर ? प्रत्येकाला उत्तम आरोग्य पाहिजे हि बाब जरी खरी असली तरी ते आरोग्य आजकालच्या फास्ट लाइफमध्ये मिळवायचं कसं हा एक मोठा प्रश्न सगळ्यांना भेडसावत आहेच, तर मग चला पाहूया आयुर्वेद आपल्याला कश्या प्रकारे आरोग्य प्राप्तीसाठी मदत करू शकेल.
आयुर्वेदाच्या दृष्टीने आरोग्य प्राप्त होणे म्हणजे आपल्या शरीरामध्ये वात,पित्त आणि कफ या त्रिदोषाचा, ७ धातूचा आणि ३ मलांचा जेव्हा प्राकृत अवस्थेत असतील किंवा समतोल अवस्थेत तेव्हा आपल्याला आरोग्य प्राप्त झालं असं आपण बोलू शकतो.
तर आपल् आरोग्य चिरकाल टिकून राहावं तर आयुर्वेदाने आपल्याला सांगितलं आहे कि आदर्श दिनचर्या (दैनिंदिन) हे आपण दररोज पाळायला हवी. म्हणजे काय हो ?
१) आयुर्वेदानुसार दररोज सकाळी ब्रम्हमुहूर्तला आपण उठलं पाहिजे म्हणजे सूर्योदयापूर्वी साधारण १ ते २ तास.
२) त्यानंतर मल मूत्र विसर्जन करावे. (टॉयलेटमध्ये वर्तमान पत्र किंवा मासिक न वाचता पूर्ण समाधानकारक करावे)
३) दंतधावन – (दात घासणे) – आयुर्वेदानुसार आपण जी काही टूथपेस्ट सकाळी वापरतो ती फक्त मधुर रसाची असू नये. तर आयुर्वेद सांगतो कि दंत धांवणासाठी आपण नीम, खदिर, अर्जुन आणि करंज या औषधी वनस्पतीचा चूर्णाचा वापर आपण केला पाहिजे जेणे करून आपल्याला दंत आरोग्य प्राप्त होईल.
तासानं तास “मोरी” घासल्याप्रमाणे दात घासू नये त्यामुळे दातावरील इनामलचा थराला इजा होऊ शकते.
४) जिव्हा निर्लेखन – जीभ साफ करणे.
५) गंडूष – जिभ साफ करून झाल्यावर मुख कुहरामध्ये तीळ तेल किंवा पाण्यानी चूळ भरणे. ज्यामुळे हिरड्या आणि दंत आरोग्य प्राप्त होते.
६) व्यायाम –
आयुर्वेदानुसार व्यायाम हा फक्त सकाळच्या काळातच केला तरच त्याचा फायदा आपल्याला १०० टक्के होतो म्हणून नेहमी व्यायाम हा सकाळीच करावा. व्यायाम करण्यासाठी जिमला जाणं जरुरीचं आहे असं नाहीये तर सकाळी फास्ट वॉलकिंग जरी केलं तर ते आरोग्य आपल्याला प्रदान तर करतच त्याचप्रमाणे आपली कार्यक्षमता वाढवून आपल्याला पचनाच्या विकारांपासून सुद्धा लांब ठेवते.
सकाळी कामाला जाताना घरापासून रेल्वे स्टेशन पर्येंत तर आम्ही दररोज चालत जातो असं सांगणारा जनसमुदाय बराच आहे पण त्यांना खास सांगू ईच्छितो कि, व्यायाम करताना आपलं मन हे आपल्या शरीरावर केंद्रित असणे गरजेचे आहे आणि आपण आरोग्य प्राप्ती साठी व्यायाम करतो एवढा हेतू ठेऊन व्यायाम केला तर तोच ज्यास फलदायी ठरतो, सकाळी कामावर जाताना आपल्या मनात ७.४० ची लोकल किंवा बस पकडायची असचं असत त्यामुळे ते चालणं काही आरोग्यास उपयोगी पडत नाही. थोडक्यात सांगायचं झाल तर “कामात काम, स्नानात लघवी” करण्याचा प्रयत्न करू नये.
“आम्हाला वेळ नाही मिळत हो” असा जनसमुदाय तर फार ज्यास्त आहे त्यांच्या साठी खास “आज व्यायामासाठी वेळ नाही तर उद्या ठेवढाच वेळ हॉस्पिटलमध्ये काढायची तयारी ठेवा. “
आता पुढचा प्रश्न येतो कि व्यायाम किती वेळ करावा किंवा केव्हा थांबवावा ? आयुर्वेद सांगतो कि व्यायाम अर्धशक्ती व्हायला पाहिजे, मग आपल्याला समजणार कस अर्धशक्ती शरीराची वापरली कि नाही ? त्याच उत्तर पण आयुर्वेदामध्ये काही हजार वर्षांपूर्वी आधुनिक तंत्रज्ञान नसताना लिहून ठेवलं आहे, ते म्हणतात कि व्यायाम चालू केला कि जेव्हा आपल्या कपाळ आणि नाका जेव्हा घाम यायला लागतो किंवा जेव्हा तोंडानी श्वास घ्यायची वेळ येते त्यावेळी व्यायाम थांबवला पाहिजे. हे सगळी किंवा या पैकी कोणतेहि लक्षण जर जाणवायला लागलं म्हणजे आपली अर्ध शक्ती वापरली गेली असं समजावं आणि नेहमी लक्षात ठेवा कि व्यायाम हा हळू हळू वाढवला पाहिजे नाही तर शरीराला इजा होण्याची शक्यता असते.
७) नाश्ता – ब्रेकफास्ट हे संकल्पना मुळात भारतीय नसून ब्रिटिश लोकांनी भारतात आणली आणि ती आपल्या भारतीय संस्कृती मध्ये रुजवली हे गोष्ट आपलं विसरता कामा नये.
सध्या जोरात फॅड चालू आहे कि नेहमी “हेवी (भरपूर) करायला पाहिजे, हे आयुर्वेदाच्या दृष्टीने अगदी चुकीचे आहे. नाश्ता हा अर्धाजेवण असता कामा नये. नेहमी पचायला हलका असणं गरजेचं आहे. उदा – चहा (बिन दुधाचा), तांदळाचं घावण (न आंबवलेले), उपमा, थालीपीठ, पोहे कधीतरी, काळेमनुके, १ ते २ खजूर किंवा फळ हे आपल्या नाश्त्याचे
स्वरूपअसायला पाहिजे कारण हे अन्न आपल्या शरीराला अगदीजन्मापासून सात्म्य आहे. बिस्कीट, पाव किंवा बटर हे
बेकरीफूड आपल्या पचन संस्थेसाठी पचनास जड असतात सातत्यानेसेवन केल्यास पुढे जाऊन अजीर्ण, आम्लपित्त सारखे आजार व्हायला सुरवात होते.
८)भोजन – आयुर्वेदामध्ये भोजनाचा काळाबद्दल वर्णन करतानालिहिलं आहे कि मनुष्याच्या भोजनाचा काळ प्रातःकाळ आणिसायंकाळी फक्त दोन वेळा भोजन करावे असे लिहिलं आहे. यामध्ये काही खाऊ नये कारण भोजन करण्याची विधीहिअग्निहोत्र करण्यासमान आहे, अग्निहोत्र कर्म हे फक्तप्रातःकाळ आणि सायंकाळीच केल जात. जेव्हा भुकेचा अग्नीतीव्र होईल त्यावेळी भोजन करावे असे आयुर्वेदाने सांगितलं आहे.
१) भोजनाची सुरवात नेहमी २ छोटे आल्याचे तुकडे आणि थोडंसं सैंधव मीठ असं एकत्र खाऊन करावी.
२) भोजनाची सुरवात हे नेहमी मधुर रसाच्या पदार्थापासून करावी कारण षड्रसांपैकी (मधुर, अम्ल , लवण, तिखट, कडू आणि तुरट) मधुर रस हा पचनास सर्वात जड असतो त्यामुळे त्याचे सेवन नेहेमी भोजनाच्या सुरवातीला करावे ना कि शेवटी (पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे).
३) मधुर रसाने – रक्त ,
अम्ल रसाने – मज्जा धातू,
लवण रस – अस्थी ,
कडू रस – मेद
तिखट रस – मांस
तुरट रस – रस धातू वर्धनाचे कार्य होतेच त्याचा बरोबर हा षड रसात्मक आहार शुक्र धातूला सुध्दा पोषण द्यायचं कार्य करतो.
४) भोजनामध्ये नेहमी तुरीच्या (पित्त आणि गॅस वाढवते म्हणून) ऐवजी मूगडाळीचे वरण + भात आणि कमीत कमी २ चमचे गाईच्या तुपाचा समावेश असला पाहिजे.
५) भोजन करताना जल पानाचे नियम – जल नेहमी कोमट असावे.
आयुर्वेद सांगतो कि भोजन पूर्वी जर जलपान केले तर ते अजीर्णास कारणीभूत आहे, भोजनमध्ये घोट घोट भर जलपान केले तर ते पचनास मदत करून अमृतसमानकार्य करते , आणि भोजन पश्च्यात जलपान केले तर ते विषाप्रमाणे कार्य करते. त्यामुळे नेहमी भोजन मध्ये घोट घोटभर कोमट जलपान करावे.
६) भोजनमध्ये फळाचे सेवन करायचे असेल तर ते नेहमी भोजनाच्या सुरवातीला करावे.
७) शक्यतो दही हे नेहमी सेवन करणे टाळावे खास करून रात्री सेवन करू नाहीये कारण आयुर्वेदानुसार ते बऱ्याच आजाराचे कारण आहे. आणि जर दही सेवन करायचे असेलच तर ते ताकाच्या स्वरूपात केले तर आरोग्यास उत्तम.
८) नवीन युग नवीन वाईट सवई असणारच, प्रकर्षाने सांगू इच्छितो कि भोजन करताना आपले मन हे आपल्या शरीरावर आणि आपल्या अन्नावर केंद्रित असावे, कमीत कमी जेवताना तरी टीव्ही, मोबाइलचा वापर टाळावा हे नक्कीच आरोग्यास उपयोगी आहे. आणि तरुण पालकांना विनंती आहे कि आपला लहान पोरगा किंवा पोरगी जेवण करत नाही म्हणून त्याच्या समोर मोबाईल वर विडिओ दाखवून जेवायला द्यायच्या वाईट सवई त्यांना या लहान वयात आपण लावू नका.
९) रात्रीच जेवण किंवा अन्न दुसऱ्या दिवशी खाणे याला आयुर्वेद पर्युषित किंवा शीळ अन्न म्हणून संबोधते आणि हे अन्न बऱ्याच रोगाचं प्रमुख कारण सांगितलं आहे, त्यामुळे अन्न फुकट जाईल या हेतूने आपण जर रात्रीच अन्न दुसऱ्या दिवशी नास्ता किंवा भोजनासाठी वापरात असला तर ते आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे ते त्वरित थांबवले गेले पाहिजे.
१०) दररोज लसूण २ कळी तुपात तळून भोजन करत असताना खाणे आरोग्यास उत्तम आहे.
११) भोजन पश्च्यात आयुर्वेदामधे दररोज साधं तांबूल (विडा – साधं पान) सेवन करायला सांगितलं आहे.
१२) भोजन पश्च्यात १०० पावले अगदी हळुवार चालणे जेणे करून खालेले पचण्यास मदत होईल.
आयुर्वेदाचे असे काही दिनचर्येमधील गोष्टी आपण दररोजपाळावी तर आपलं आरोग्य हे नेहमी आपल्या मुठीतच राहणार हे गोष्ट आपण विसरता कामा नये.
वाचनकांना विनंती – आयुर्वेद विषयक अधिक माहितीसाठी ब्लॉग पेज फॉलो करा आणि लोकांना पर्येंत आयुर्वेद पोहचव्यासाठी हा ब्लॉग शेअर करा.
http://www.drgauravdave.wordpress.com
– Dr.Gaurav Davee
International Ayurveda consultant
Email – drgauravdave17@hotmail.com
Mobile number – +91 8898888525
Panvel,